Saturday, December 9, 2023
Homeआध्यात्मिकघराच्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पांची अशी प्रतिमा चुकूनही लावू नका.. गरिबी येईल.!!

घराच्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पांची अशी प्रतिमा चुकूनही लावू नका.. गरिबी येईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते. त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते. घर एक असे ठिकाण असते जिथे व्यक्तीला शांती तसेच प्रसन्नता मिळते. कामावरून घरी आले की घरात प्रसन्न वाटले पाहिजे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरातही काही बदल कऱण्याची गरज असते.

आणि मित्रांनो घराचा मुख्य भाग असतो ते म्हणजे प्रवेशद्वार म्हणुनच आपण आपल्या घराच्या दरवाजावर अशा काही वस्तू ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे सकारात्मक बदल होईल आणि त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजाची दिशा वास्तुशास्त्राचा एक महत्त्वाचा भग असतो. घराचा दरवाजा पूर्व दिशेला असल्यास सगळ्यात उत्तम मानले जाते. यामुळे आयुष्यात नेहमी विजय, सुख तसेच शुभ घटना घडतात आणि उत्तर दिशेला दरवाजा असल्यास ते कुबेराचे दार मानले जाते.

आणि मित्रांनो या दिशेला दरवाजा असल्यास धन तसेच सुखप्राप्ती होते आणि त्याचबरोबर आपण जर आपल्या घरातील मुख्य दरवाज्यावर काही देवी-देवतांची मूर्ती किंवा प्रतिमा लावली तर यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतीलच त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घराचे प्रवेशद्वार जर दक्षिण दिशेला असेल, तर ते दक्षिणमुखी भवन नावाने संबोधले जाते. दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वारामुळे घरात काही समस्या उद्भवू शकतात. त्यासाठी घरातील प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस आत व बाहेर अशा दोन्ही ठिकाणी गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. गणपती स्थापनेमुळे वास्तुदोष दूर होतो. काही दिवसातच फलप्राप्ती होण्यास सुरुवात होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

परंतु मित्रांनो ही गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती ही मध्यम आकाराची असावी, ती अधिक लहान किंवा अधिक मोठी नसावी, असे सांगितले जाते आणि त्याचबरोबर गणपतीची छबी असलेले तोरण प्रवेशद्वारावर बांधणे शुभ मानले जाते. सण-उत्सव, व्रत-वैकल्यांच्या काळात गणेशाची छबी असलेल्या तोरणाला विशेष महत्त्व प्राप्त होते, असे सांगितले जाते. वास्तुशास्त्रात याला अत्यंत शुभ मानले गेले आहे. वास्तुदोष दूर होण्यास तसेच वाईट नजर लागण्यापासून घराचे संरक्षण होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

परंतु मित्रांनो हे तोरण नियमितपणे, शक्य असल्यास दररोज स्वच्छ करावे. तसेच तोरण लावलेली जागाही नीटनेटकी ठेवावी. दोन्ही गोष्टी नियमितपणे धुतल्या जाव्यात. तोरणावर धूळ किंवा मातीचा थर जमू देऊ नये, असे सांगितले जाते आणि एखाद्या नवीन घरात किंवा जुन्या पण वापरात नसलेल्या घरात गृहप्रवेश करताना..

गणपतीची स्थापना करण्याचा सल्ला वास्तुशास्त्र देते. वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूस, घरात प्रवेशद्वाराकडे नजर जाईल, अशा स्वरुपात गणपतीची प्रतिमा किंवा मूर्ती स्थापन करावी. असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, असे सांगितले जाते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular