नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ. दुसऱ्याचे घर जळलं हे कळाल्यावर एकाने त्याला पत्र लिहिलं की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावं. पुढे कसा किस्सा झाला की त्याचे स्वतःचे बँकेत ठेवलेले पैसे बुडाले तेव्हा मात्र तो रडू लागला. असं कसं चालेल? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण. असं नसावं जे आपण दुसऱ्याला सांगतो तेच आपण आपल्याला सांगावं.
आज आपण बघतो आयुष्यात सर्व सुखसोयी असताना देखील आपल्याला समाधान का मिळत नाही.. आपण का एक समाधानी आयुष्य जगु शकत नाही.? तर आपला अभिमान त्याच्या आड येतो. कर्म करत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही.
स्वामी म्हणतात तुम्ही दुसऱ्याला तत्त्वज्ञान सांगण्यापेक्षा ज्या ज्या गोष्टी आम्ही दुसऱ्यांना सांगतोय स्वामीभक्त म्हणून त्या गोष्टी आधी आम्ही आचरणात आणायला हव्या. जर आम्ही सांगत असू की स्वामींना अहंकार आवडत नाही आणि तरी वागत असेल तर मी कसला स्वामी भक्त? दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ.!!
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!