नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. मित्रांनो आपल्याला आपल्या कर्माची फळे नक्कीच भोगावे लागतात. उशिरा का असेना
पण ते भोगावेच लागते. म्हणून कर्म करायच्या आधी एक वेळ विचार करा कि मी बरोबर वागत आहे का. कर्म करायच्या आधी विचार केला तर आपण वाईट कर्म करण्यापासून वाचू शकतो.
जर आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ नक्कीच मिळते. आपण वाईट कर्म केले तर एक ना एक दिवस देव आपल्याला नक्कीच शिक्षा देणार. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तुम्हाला नक्कीच तुमच्या कर्माचे फळ भोगावेच लागेल.
देवाने आपल्यासाठी उत्तम कृती सांगितलेल्या आहेत कारण कर्मच आपले नशिब घडवत असते. मित्रांनो माणसाला कर्माचे फळ हे त्याने चांगले कार्य केले तर चांगले फळ आणि जर वाईट कर्म केले तर वाईट फळ भोगावे लागणारच. देवाला आपल्याला काही द्यायचं असेल तर उशीर होऊ शकतो. पण देवाकडे आपल्यासाठी अंधार कधीच असू शकत नाही.
मित्रांनो परमेश्वराने प्रत्येक कृतीच्या फळाची वेळ आधीच निश्चित केली आहे. आपण स्वतः आपल्या नशिबाचे निर्माते आहोत. प्रत्येकाच्या नशिबानुसार त्याला फळ किंवा अशुभ फळे नक्कीच भोगावे लागतील. यावेळी आपण जे दुःख भोगत आहोत.
हे आपल्या मागच्या जन्मी केलेल्या पापांचे किंवा या जन्मी केलेल्या पापांचे किंवा वाईट कृत्यांचे फळ आहे. यामधे देवाला दोष देऊ नये. देवाच्या नियमांपैकी एक नियम असा आहे की आपली कृती ही आपल्या विचार आणि भावनांनुसार असावी लागते हे आपल्याला कळत नाही.
देवाचा नियम वेगळाच आहे जोपर्यंत जुनी पुण्य संपत नाही तोपर्यंत पापांची फळे सुरू होत नाही. आपल्या पापांची शिक्षा आपल्याला या जन्मी किंवा पर लोकात भोगवीच लागते. आपले दुःख जर आपल्याच कर्माचे फळ आहेत तर ते तर रडून का सहन करायचं.
रडल्याने दुःख दुप्पट होते आणि हसून अर्ध होतं त्यामुळे मित्रांनो नेहमी आपल्या कर्माचे फळ आपण नेहमी हसत भोगाव त्यामुळे ते दुःख दुप्पट होणार नाही आणि हसत जर आपण ते दुःख सहन केले तर ते अर्ध होऊन जाईल. निरोगी सुखी कुटुंब आपल्या चांगल्या कर्माचे फळ आहे.
तसेच मित्रांनो दुःख रोग आपत्ती, रडणे हे आपल्या वाईट कृत्यांचे परिणाम आहे. आपण भूतकाळात जे काही केले भूतकाळात जे अनुभवले त्यांचे फळ आपल्याला मिळत आहे. तुम्ही हा विचार करा की आपण जन्माला आलो तर काय घेऊन आलो आणि जाताना काय घेऊन जाणार आहोत.
ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे की आपण खाली हात आलो आहोत आणि जातानाही खाली हात जाणार आहोत. तर मित्रांनो मृत्यूच्या वेळी पैसा संपत्ती व्यवसाय नोकरी घर नातेवाईक भाऊ बहीण यांना आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही आपल्या सोबत फक्त जाणार आहे ते म्हणजे कर्म.
आपण जे काही करू ते आपल्याबरोबर नक्कीच जाईल. इतरांशी मित्रांनो कधीच कडू बोलू नका. त्यांचा अपमान करू नका. त्यांचा राग राग करू नका या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका. मित्रांनो खाणे पिणे वगैरे जे काही आपल्याला आवडते ते इतरांना मनात कोणताही संकोच न ठेवता दिले पाहिजे.
आपल्याला सांगितलेले आहे मित्रांनो जाताना तुम्ही तुमचे कर्म घेऊन जाऊ शकतात. मित्रांनो म्हणून आनंदाने राहा श्रीमंत गरीब व इतर कोणत्याही गोष्टींचा भेदभाव करू नका. आपण आपल्याबरोबर एक लहान तीळ सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. आपण किती उपाय केले तरी सर्व उपाय इथेच राहतील. त्यामुळे मित्रांनो देवाची भक्ती करा, गरजुंची सेवा करा, त्यांना मदत करा, दान करत राहावे हे नक्कीच सोबत जाईल.
जेव्हा आपण एखाद्याला दान करतो तेव्हा ते काळजीपूर्वक करा कारण एक दिवस आपल्या ते दुप्पट मिळेल. त्याचबरोबर प्रत्येक काम करताना आपण ते काम बरोबर करत आहोत का.? कोणते काम करताना चुकत आहोत का याचे भान ठेवावे म्हणूनच चुकूनही कोणाच्याही आत्म्याला दुखवू नका तुमच्या बाजूने जेवढे शक्य होईल तेवढे चांगले कर्म करा.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!