स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत स्वयंपाक घरात वापरात येणाऱ्या तव्याविषयी.. वास्तुशास्त्रातील काही महत्वाच्या गोष्टींविषयी.. मित्रांनो ताव्यासंबंधीच्या वास्तुशास्त्रानुसार तो कधीही पालथा घालून ठेऊ नये नये. कारण की तवा तेव्हाच पालथा घालतो ज्यावेळी आपल्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू होतो. कारण त्या काळात त्याचा वापर आपण करत नाहीत.. अशा परिस्थितीत घरातील चुल पेटवली जात नाही.
जर आपल्या घरात सर्व काही चांगले सुरु असेल आणि तेव्हा अश्यावेळी जर आपण असे काही केले तर आपल्या घरात अशुभ वातावरण निर्माण होते. अशुभ चिन्ह दिसू लागतात म्हणून घरातील गृहिणींनी अशी चूक करू नये. तवा नेहमी सरळच ठेवावा त्याला पालथा घालू नये.
आता या तव्याच्या योग्य जागेविषयी बोलूयात. तुम्हाला फक्त तुमच्या घरातील तव्याची जागा बदलावी लागणार आहे, जर तो या ठिकाणी असेल, तर तुमच्या घरावर हमखास गरिबी येईल,आणि म्हणूनच मित्रांनो असे होऊ देऊ नका, तवा आम्ही सांगणार आहोत त्या दिशेला ठेवा तुमची आर्थिक परिस्थिती आश्चर्यकारकरीत्या सुधारेल.
मित्रांनो तुम्हाला कल्पना नाही की, तुमच संपूर्ण घर जर तुम्ही हा तवा चुकीच्या जागी ठेवत असाल, तर बरबाद होऊ शकत, तवा ही आपल्या स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे, तवा नसेल, तर चपाती भाकरी पोळी बनूच शकत नाही , मित्रांनो आज आपण या तव्याबद्दल अशी माहिती जाणून घेणार आहोत.
जी वास्तुशास्त्रानुसार तव्याचे काय महत्त्व आह, हे आज आपण पटवून घेणार आहोत. आपल्या पैकी अनेक लोकांना हे माहिती नसेल की, स्वयंपाक घरातील तवा आणि कढई हे राहूग्रहाचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे त्याच्या चुकीच्या वापराने तुमचे नशीब बिघडू शकते. त्याचमुळे हा तवा आपण चुकूनही. घरात या चुकीच्या दिशेला ठेवायचा नाहीये.
तर घरातील एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू झालेला असतो, तेव्हाच हा तवा उलटा ठेवला जातो, कारण अशावेळी तव्याचा वापर हा वर्जित मानला गेला आहे, आणि हे आपण बघतच आलोय की अशा दुःखा च्या वेळी आपल्या घरामध्ये जेवण बनत नसतं, तर हा तवा उलटा ठेवला जातो, पण विनाकारण तवा उलटा ठेवणे हे अशुभ मानलं जात, म्हणून आपण चुकूनही तवा उलटा ठेवायचा नाही.
तवा नेहमी सरळच ठेवायचा असतो, तसेच खूप दिवसांपर्यंत एकच तवा देखील आपण वापरू नये, जुना तवा हा गंज उत्पन्न करत असतो, त्या गंजाचे अवशेष जेवणामध्ये मिसळतात व आपलं जेवण दूषित होते, अशामुळे घरातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात.
तसेच तुटलेल्या तव्यामध्ये कधीही जेवण बनवू नये, नाही तर दोष लागतात, या कारणामुळे तुमच्या घरात कधीही पैसा टिकत नाही , तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही, अशामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते, म्हणून तवा किंवा कढई यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये, या वस्तूंवर कधीही खरकटी भांडे ठेवू नये, या दोन वस्तूची पवित्रता राखून ठेवणे खूप गरजेचे असते.
तुम्हाला घरातील तवा आणि कडई जास्तीत जास्त स्वच्छ ठेवता येईल याकडे लक्ष द्यावे लागेल, ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न आपण वेळोवेळी करायचा आहे, या दोन वस्तू स्वच्छ ठेवू तेवढ्या आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा अडका जास्त प्रमाणात येऊ लागेल, आपल्या घरामध्ये भगवंताचे स्वामींची वास्तव्य माता अन्नपूर्णेचे वास्तव्य कायमस्वरूपी टिकवून राहील.
जी व्यक्ती नित्यनेमाने पहिली चपाती गाई साठी बनवते, ज्या घरात गाई ला स्वतःच्या हाताने पहिली चपाती खाऊ घातली जाते, त्या घरी माता लक्ष्मी तथा अन्नपूर्णा सदैव वास्तव्य असतात. कारण गाईंमध्ये सर्व देवीदेवतांचं वास्तव्य असते.
आणि जी व्यक्ती हे मनापासून करते, त्या व्यक्तींची पा ‘पांतून मुक्ती होते, तसेच संपूर्ण कुटुंबाला त्याचे पुण्य हे मिळत असते, तसेच कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नये, यामुळे घरामध्ये भांडण, वा’दविवाद, आजारपण येते, म्हणून तवा थंड झाल्यावरच पाणी टाकावे, किंवा तो स्वच्छ करावा. म्हणूनच कढई आणि तवा या दोन वस्तूंची स्वच्छता नेहमी ठेवली गेली पाहिजे.
घरात तवा वापरत नसाल तेव्हा दृष्टीआड ठेवावा.
तवा किंवा कढई कधीही उलटे करुन ठेवू नये. जेवण तयार होत असलेल्या जागेच्या उजवीकडे तवा आणि कढई ठेवावी. जेवण तयार झाल्यावर रिकामी कढई किंवा तवा गॅसवर ठेवू नये. गरम तव्यावर पाणी टाकू नये.
यादरम्यान होणारा आवाजाने आपल्या जीवनात समस्या उद्भवू शकतात. तवा गार झाल्यावर तव्याला लिंबू आणि मिठाने घासावं, याने तवा चमकेल आणि आपले भाग्यही. तवा किंवा कढईला टोकदार वस्तूने खरडणे टाळावे. तवा किंवा कढईला उष्टं करू नये. यात जेवू नये. या दोन्ही वस्तूंची काळजी घेतल्याने घरातून नकारात्मकता दूर होते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!