Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकया 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी… नकारात्मक शक्ती घरात येतात..

या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी… नकारात्मक शक्ती घरात येतात..

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्याच घरांमध्ये देवघर हे असते आणि आपण दररोज देवघर पूजत असतो. म्हणजे देवी देवतांची पूजा करीत असतो. या पूजेमध्ये आपण धूप, अगरबत्ती, दिवा यांचा वापर करतच असतो. मित्रांनो हिंदू धर्मांमध्ये देवांची पूजा करण्याची परंपराच आहे आणि देवपूजेचे आपणाला शुभ फळ देखील प्राप्त होत असते.

तर मित्रांनो आपल्या देवघरामध्ये वापरली जाणारी एक वस्तू म्हणजेच अगरबत्ती. मित्रांनो अगरबत्तीला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेलेले आहे. त्यामुळे मित्रांनो आपण सकाळ-संध्याकाळ आपल्या देवघरांमध्ये अगरबत्ती ही लावावी. यामुळे मग आपल्या घरामध्ये सकारात्मक विचार प्रभावित होतात. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. परंतु मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रांमध्ये अगरबत्तीच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत.

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, विविध देवतांच्या पूजा-विधी वेळी अगरबत्ती वापरली जात असली तरी आठवड्यातील दोन दिवशी अगरबत्ती वापरण्यास मनाई आहे. असे केल्याने घरातील शांती-समृद्धीवर परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो कोणत्या दोन दिवशी आपल्याला अगरबत्ती आपल्या घरामध्ये लावायची नाही याविषयी आपण आता जाणून घेऊया.

मित्रांनो अगरबत्ती लावल्याने आपले घर हे खूपच शांततेचे राहते. प्रसन्नतेचे राहते आणि यामुळे देवताही आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच त्यांच्या कृपेने सुख समृद्धी देखील आपणाला प्राप्त होते. मित्रांनो अगरबत्तीचा जो धूर असतो तो हवा शुद्ध करतो आणि त्यामुळे अनेक जिवाणू हानिकारकचे जिवाणू असतात ते नष्ट देखील होतात.

तसेच मित्रांनो अगरबत्ती शिवाय धूपबत्ती, कापूर लावून आपण देवांची पूजा करणे देखील शुभ मानले गेलेले आहे. तर मित्रांनो आठवड्यातील कोणत्या दोन दिवशी आपल्याला अगरबत्ती लावायची नाही हे जाणून घेऊया.

वास्तूनुसार, घरामध्ये बांबूच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. परंतु रविवारी आणि मंगळवारी बांबू जाळण्यास शास्त्रात निषिद्ध मानले जाते. त्यामुळे रविवारी आणि मंगळवारी अगरबत्ती लावू नये. असे केल्याने मानसिक आणि आर्थिक नुकसान होण्याचा धोका असतो. त्यामुळे घरात गरिबी येते आणि कुटुंबात तणाव राहतो असे मानले जाते.

तसेच पौराणिक शास्त्रानुसार मंगळवार आणि रविवारी बांबू जाळल्याने संततीची हानी होण्याचा धोका असतो. याशिवाय या दिवशी बांबू जाळल्याने पितृदोष निर्माण होतो.मग त्यामुळे कुटुंबात सुख-शांती राहत नाही. बांबू जाळल्याने दुर्दैव येते. परिवाराला आर्थिक संकटातून जावे लागेल. त्यामुळे मंगळवार आणि रविवारच्या दिवशी शास्त्रात अगरबत्ती जाळण्यास मनाई आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular